Skip to main content

समाजकार्याचा पूर

सामाजिक काम म्हणजे काय ?

माझ्या मते जगात सामाजिक काम नावाची वस्तू वगैरे काही नसते. असते ते फक्त काम, आवडते किंवा नावडते आणि प्रत्येक कामातून आपण समाजातील कुठल्या तरी व्यक्तीला वस्तू किंवा सेवा पुरवीत असतोच. मग तो सकाळी वर्तमान पत्र वाटणारा असो किंवा कार्पोरेट कंपनीतला एक आय.टी इंजिनिअर असो. मी शेतकर्याचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आणि जो शेतकरी अक्ख आयुष्य इतके काबाड कष्ट करून तुम्हा आम्हाला अन्न पुरवतो, त्याला काय म्हणाव ? जात-पात, धर्म-पंथ, वर्णभेद हि असमानता काय कमी होती कि आता आपण कामात पण असाच भेदभाव करायला लागलो आहे.

“द सेल्फिश जिन” या पुस्तकात रिचर्ड डॉकिन्स लिहतो कि “या पृथ्वी वरील एक एक जीव हा भयंकर स्वार्थी आहे, आणि या स्वार्थीपणामुळेच आपले अस्तित्व आहे.” आपले पूर्वज स्वार्थी नसते तर आपण आज सामाजिक कामाबाद्द्दल बोलायला जिवंत नसतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कामात स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापोटी  तो/ती ते काम करत असतो. आता हा स्वार्थ नेहमी व्यक्तीनुसार बदलत असतो. हुशार स्वार्थी लोक निसर्ग, आरोग्य, शेती वगैरे महत्वाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करतात आणि उरलेल्यांसाठी स्वार्थी असणे म्हणजे खूप पैसे कमावणे आणि नको त्या अनावश्यक वस्तूंचा संचय करणे.

माझ्याबद्दल बोलायचे झाल तर मला शुद्ध अन्न,पाणी आणि हवा आज आणि समोर भविष्यात पण हवी आहे ज्यावर कुणाची मक्तेदारी नसेल म्हणून मी “अन्न साक्षरते” मधून या बद्दल लोकशिक्षणाचा प्रयत्न करत असतो.

लोकांच्या स्वार्थीपणाच्या परीभाशा बदलल्याने त्या पुन्हा लोकांना पटवून देण्याकरिता याप्रकारच्या कामाची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. घरी बसून किंवा संगणकावरून समाज घडवणारे भरपूर मिळतील. पण कुणी तरी कामाला आणि समाजाला वेगळ्या चष्म्याने बघितले पाहिजे. समाजात जाऊन काम करायला पाहिजे. आपण आपल्या प्रामाणिक कामातून समाजात काही भर टाकतोय काय ? याचा विचार केला पाहिजे.
कुणीतरी अश्या आगळ्यावेगळ्या वाटा निवडल्याने संतुलित नाही म्हणता येणार पण समाजाचा गाडा डगमगीत का होईना पण चालतोय. बाकी लोकांना त्यांचा स्वार्थ कळायला खूप उशीर व्हायला नको म्हणजे झाल.  

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

स्वार्थापोटी

गेल्या 1 महिन्यापासून संपूर्ण भारतात इंडियन प्रिमियर लीग चा धुमाकूळ दिसतोय. यूरोपियन फुटबॉल च्या धर्तीवर भारतात सुद्धा शहरानुसार व्यावसायिक तत्वावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. विविध शहरानुसार संघ व खेडाळू वाटले गेले. हा पूर्ण प्रकार अगदी व्यावसायिक तत्वावर सुरू असतो. यात देशाचा अभिमान किंवा शहराचा अभिमान वगैरे काहीच नसते. केवळ मनोरंजन हा हेतु लक्षात घेऊन या   लीग चे आयोजन केले जाते. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात एक सामना झाला व कोलकाता संघाने चेन्नई संघावर मात केली. चेन्नई संघाचा कर्णधार आहे महेंद्रसिंह धोनी व त्याला ५ वर्षाची छोटी मुलगी आहे. हा पराभव काही लोकांनी इतका मनावर लावून घेतला की चक्क धोनीच्या मुलीला सार्वजनिकरित्या नको त्या धमक्या देण्यात आल्या. कामगिरीसाठी संघाची किंवा संघातील खेडाळूंची टीका करणे हे साहजिकच आहे. पण एका व्यावसायिक संघाच्या पराभवाबाबत इतके वाईट वाटणे आणि त्यामुळे खेडाळूंच्या घरच्यांना धमकी देणे हा सर्वच प्रकार आज आपण कुठल्या प्रकारच्या समाजात राहतो याची जाणीव करून देते. गेल्या काही वर्षापासून नको त्या खालच्या पातळीवर जाऊ...