Skip to main content

समाजकार्याचा पूर

सामाजिक काम म्हणजे काय ?

माझ्या मते जगात सामाजिक काम नावाची वस्तू वगैरे काही नसते. असते ते फक्त काम, आवडते किंवा नावडते आणि प्रत्येक कामातून आपण समाजातील कुठल्या तरी व्यक्तीला वस्तू किंवा सेवा पुरवीत असतोच. मग तो सकाळी वर्तमान पत्र वाटणारा असो किंवा कार्पोरेट कंपनीतला एक आय.टी इंजिनिअर असो. मी शेतकर्याचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आणि जो शेतकरी अक्ख आयुष्य इतके काबाड कष्ट करून तुम्हा आम्हाला अन्न पुरवतो, त्याला काय म्हणाव ? जात-पात, धर्म-पंथ, वर्णभेद हि असमानता काय कमी होती कि आता आपण कामात पण असाच भेदभाव करायला लागलो आहे.

“द सेल्फिश जिन” या पुस्तकात रिचर्ड डॉकिन्स लिहतो कि “या पृथ्वी वरील एक एक जीव हा भयंकर स्वार्थी आहे, आणि या स्वार्थीपणामुळेच आपले अस्तित्व आहे.” आपले पूर्वज स्वार्थी नसते तर आपण आज सामाजिक कामाबाद्द्दल बोलायला जिवंत नसतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कामात स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापोटी  तो/ती ते काम करत असतो. आता हा स्वार्थ नेहमी व्यक्तीनुसार बदलत असतो. हुशार स्वार्थी लोक निसर्ग, आरोग्य, शेती वगैरे महत्वाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करतात आणि उरलेल्यांसाठी स्वार्थी असणे म्हणजे खूप पैसे कमावणे आणि नको त्या अनावश्यक वस्तूंचा संचय करणे.

माझ्याबद्दल बोलायचे झाल तर मला शुद्ध अन्न,पाणी आणि हवा आज आणि समोर भविष्यात पण हवी आहे ज्यावर कुणाची मक्तेदारी नसेल म्हणून मी “अन्न साक्षरते” मधून या बद्दल लोकशिक्षणाचा प्रयत्न करत असतो.

लोकांच्या स्वार्थीपणाच्या परीभाशा बदलल्याने त्या पुन्हा लोकांना पटवून देण्याकरिता याप्रकारच्या कामाची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. घरी बसून किंवा संगणकावरून समाज घडवणारे भरपूर मिळतील. पण कुणी तरी कामाला आणि समाजाला वेगळ्या चष्म्याने बघितले पाहिजे. समाजात जाऊन काम करायला पाहिजे. आपण आपल्या प्रामाणिक कामातून समाजात काही भर टाकतोय काय ? याचा विचार केला पाहिजे.
कुणीतरी अश्या आगळ्यावेगळ्या वाटा निवडल्याने संतुलित नाही म्हणता येणार पण समाजाचा गाडा डगमगीत का होईना पण चालतोय. बाकी लोकांना त्यांचा स्वार्थ कळायला खूप उशीर व्हायला नको म्हणजे झाल.  

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...