Skip to main content

Posts

Showing posts with the label Injustice

कामाचं काय ?

  या धकाधकीच्या आणि प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात आपण काय करतोय ? का करतोय ? आणि आपल्या कृतीचा स्वतःवर आणि समाजावर काय परिणाम होतोय याबद्दल विचार करायला वेळचं   उरत नाही . त्यामुळे आपल्या शिक्षणाचा आणि विकासाचा उपयोग हा बऱ्याचदा विविध स्वरूपातील वर्गवारीला बळकटचं   करण्या करीता होत असतो .   जवळपास दहाएक वर्षाआधी आमिर खान एका घड्याळीच्या जाहिरातेत खुद्द एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक (Managing Director)   असून सुद्धा संगणक दुरुस्ती चे सोपी आणि सामान्य काम हसत हसत करतो आणि त्याबद्द्दल विचारपूस केल्यावर तो म्हणतो कि   " काम लहान किंवा मोठ नसतं , काम तर काम असतं ." आणि त्यासाठी बराच भाव खाऊन जातो . पण वास्तव हे आहे काय ? तर कदाचित याचे उत्तर सगळ्यांचा तोंडून नाही असेच निघेल . माझे काम , माझा व्यवसाय आणि माझे क्षेत्र कशाप्रकारे   महत्त्वाचे आहे आणि माझ्या किंवा माझ्या कामाच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा गाडाचं चालणार नाही य...

वाघ एके वाघ.

बाबाराव , गेल्या ४ - ५ वर्षांपासून २मुख्य समस्यांनी ग्रासलेले आहे . पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढत त्रास आणि दुसरी म्हणजे नाईलाजाने / बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर . बाबाराव वर्धा जिल्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे . नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी - म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय . गावालगतच कुरण आणि जंगल यावर गाई - म्हशी साठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार . त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा . जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरत्या व्हायचे . तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशु होतेच , त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला . तरीपण याआधी बाबारावला   अश्या प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही . सध्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरु आहे यावर बाबाराव ला हसावे कि रडावे हेच ...