Skip to main content

Posts

Showing posts with the label Consumer

सावजी रस्सा

“नागपूर मधे अस्सल सावजी कुठे मिळते ?” हा नागपूर भ्रमंती वर असलेल्या बहुतांश लोकांचा अगदी ठरलेला प्रश्न आहे. त्यात आणखी भर म्हणजे बऱ्याच लोकप्रिय वायरल इंस्टाग्राम रिल्सच्या प्रभावामुळे सावजीच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली. झणझणीत तिखट रस्यासोबत मासाहर, पाटवडी आणि सोबत भाकरी याचे बरेच शौकीन आहेत. नागपूरच्या बाहेरील लोकांना नागपूरकर इतके तिखट आणि मसालेदार अन्न कसे पचवत असतील याबद्दल नेहमी कुतुहूल असते. २०२५ साली सिंगापूरमध्ये एका आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवात नागपूरच्या सावजी पाककृतीचे कौतुक झाले होते. सावजी आणि नागपूर जणू काही आता एका नाण्याचा दोन बाजू झाल्या आहेत. पण अगदी 150 वर्षाआधी सावजी नावाच्या पाककृतीचे आणि नागपूरचे दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हते. आज सावजी खाणे म्हणजे मेजवानी, काही तरी विशेष याउलट सावजी पाककृतीचा उगम झाला तो म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षेला पूर्ण करण्यासाठी. कामगार वर्गाच्या कल्पकतेतून आणि प्रसंगावधेतून निर्माण झालेली पाककृती म्हणजे आजची आपली किंवा आपला सावजी. 1877 साली जमशेदजी टाटांनी नागपूर शहरात शुक्रवारी तलावाच्या बाजूला एम्प्रेस मिल उभारली. विदर्भात मोठ्या प्र...

संत्रा नगरीची तहान

महाराष्ट्राच्या बाहेर मी नागपूरचा आहे अस सांगितल की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे “संत्री वाले नागपूर, बरोबर ?”. संत्रा नगरी किंवा ऑरेंज सिटी हे नागपूचे टोपणनाव सहज लागलेलं नाही. नागपूर शहर हे नाग नदीवर वसल्याने त्याचे नाव नागपूर पडल्याची परंपरा मानली जाते, आणि याच नागपूरची ओळख पुढे संत्र्यांशी इतकी घट्ट जोडली गेली की “संत्री” शहराचं प्रतीक बनलं. अठराव्या शतकात भोसले राजवटीत नागपूर आणि विदर्भाच्या काही भागात संत्र्यांची लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. काळ्या मातीचा ओलावा टिकून ठेवणाच्या गुणधर्म, येथील हवामान आणि बाजाराची पार्श्वभूमी यांमुळे संत्री नागपुरात रुजली आणि इतकी की नागपूरचे पर्यायी नाव संत्रा नगरी झाले. समोर जाऊन सन २०१४ मध्ये नागपूरच्या संत्र्याला भौगोलिक नामांकन (Geographical Indication tag) मिळाल आणि “नागपुरी संत्री” ही ओळख अधिकृत झाली. शहराचं नाव, आपली बाजारपेठ आणि संत्र्याच्या बागा, या तिन्ही गोष्टी संत्र्याशी एकरूप झाल्या. आपल्या नागपुरी संत्र्याची ताकद आपल्या आगळ्या वेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. नागपूर आणि विदर्भाच्या च्या उष्ण-कोरड्या हवामानात, कोरडवाहू आणि काही...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...