2014 साली मी चंद्रपूर च्या ताडोबा अभयारण्यात वाघ बघायला गेलो होतो. गब्बर नावाचा वाघ छोट्या पाण्याचा डोहात शांतपणे बसून होता. सुरुवातीच्या 4-5 मिनिटांत माझ्या मधे असलेली नैसर्गिक अधिवासात वाघाला बघण्याची उत्सुकता थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर माझा मेंदू गब्बर ला सोडून परिसरातील आजूबाजूच्या बाबींची सुद्धा नोंद घ्यायला लागला आणि अगदी थोड्याच वेळात मला गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लागल. एका वाघाला बघायला जवळपास चाळीस-पन्नास सफारीच्या गाड्या होत्या अणि प्रत्येक गाडी वाघाची एखादी छान फोटो घेण्याचा नादात एकमेंकावर चढाओढ करून गब्बर च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या. करिश्माई किंवा आकर्षक प्राण्याच्या यादीत असल्याने आणि अन्न साखळीच्या अगदी शीर्षस्थानवर असल्याने वाघाच्या संवर्धनात आणि त्याला बघण्यात आपण नेहलीच अग्रेसर असतो. यामुळेच गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढत आहे आणि सोबतच आपल्या नागपूरचा रुबाब सुद्धा नागपूर हे जगातील कदाचित एकमेव शहर असेल ज्याच्या शंभर किलोमीटर परिसरात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. पेंच नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरच आहे. बोर अवघ्या पंचावन्न किलोमीटरवर. उमरे...