Skip to main content

कामाचं काय ?


 

या धकाधकीच्या आणि प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात आपण काय करतोय ? का करतोय ? आणि आपल्या कृतीचा स्वतःवर आणि समाजावर काय परिणाम होतोय याबद्दल विचार करायला वेळचं  उरत नाही. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा आणि विकासाचा उपयोग हा बऱ्याचदा विविध स्वरूपातील वर्गवारीला बळकटचं  करण्या करीता होत असतो.

 

जवळपास दहाएक वर्षाआधी आमिर खान एका घड्याळीच्या जाहिरातेत खुद्द एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक(Managing Director)  असून सुद्धा संगणक दुरुस्ती चे सोपी आणि सामान्य काम हसत हसत करतो आणि त्याबद्द्दल विचारपूस केल्यावर तो म्हणतो कि  "काम लहान किंवा मोठ नसतं , काम तर काम असतं." आणि त्यासाठी बराच भाव खाऊन जातो. पण वास्तव हे आहे काय ? तर कदाचित याचे उत्तर सगळ्यांचा तोंडून नाही असेच निघेल. माझे काम, माझा व्यवसाय आणि माझे क्षेत्र कशाप्रकारे  महत्त्वाचे आहे आणि माझ्या किंवा माझ्या कामाच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा गाडाचं चालणार नाही या स्वरूपात प्रत्येक व्यक्ती हा त्याचा  कामाचा आणि त्याचे महत्त्व याबद्दल चा गाजावाजाचं करत असतो. पण हे करत असताना माझेच काम श्रेष्ठ आणि बाकी सर्व दुय्यम हि वर्गवारी जन्माला येत आहे याचा अंदाज सुद्धा आपल्याला नसतो. भारत सारख्या देशात जिथे आधीच धर्म, समाज, जात, पंथ आणि विविध दिसणाऱ्या वर्गवाऱ्या आहेत त्यामध्ये आणखी एक कामाच्या स्वरूपातील  नवीन वर्गवारी तयार करायची कि नाही किंवा हि नवीन वर्गवारी समाजाला परवडेल काय ? याबद्दल पण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

 

अभियांत्रिकेच्या काही विशिष्ट महाविद्यालयात  किंवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी विशिष्ट गुन लागतात. अर्थातच त्याप्रकारचे गुण मिळवणे हीसुद्धा आत्ताच्या घडीला तारेवरची कसरत होऊन बसलेली आहे. त्यामुळे प्रवेश मिळवणारे मोजकेच असतात आणि तिथूनच आम्ही निवडक विशिष्ट दर्जाचे आणि उरलेले ज्यांना प्रवेश मिळालेला नाही ते दुय्यम असा शिक्षण ते तुम्ही करणारे काम या वर्गवारीचा प्रवास सुरु होतो. सुरुवातीला चलन अस्तित्वात यायच्या आधी वस्तुविनिमय करून व्यापार चालायचा, त्यामुळे कुठले तरी एक काम किंवा काम करणारा कारागीर हा श्रेष्ठ किंवा दुय्यम असा भेदभाव होत नसे कारण प्रत्येक व्यक्तीचे काम आणि त्याला अवगत असलेली कला हे इतर प्रत्येक व्यक्तीच्या कामात येत असे. पण चलनाच्या उदयानंतर हे चित्र पालटले आणि कलेची अवगत असलेल्या कौशल्याची  समाजावर प्रभुत्व असलेल्यांनी विविध वर्गवारीत विभागणी केली आणि यात इतर विविध सामाजीक आणि वैयक्तिक बाबींची भर ती होतीच.

 

उदाहरणार्थ, एक गाव घेऊ बऱ्याच दुर्गम भागात वसलेले. साहजिकच पिण्याचे पाणी, रस्ते, पूल यासारख्या मूलभूत सोयींचा अभाव. गावालगत असलेल्या नदीला दर पावसाळ्याला पूर येऊन हे गाव मुख्य प्रवाहापाससून तोडले जाते आणि लोकांना बऱ्याच गैरसोयीचा सामना करावा लागतो. एकदा पूर ओसरला कि कपडे वाटप,धान्य वाटप, रोग निदान शिबीर वगैरे प्रकार सुरु होतो आणि हे वर्षानुवर्षे सुरु असते, आणि अश्या प्रकारच्या कामाचा उदो उदो करून बरीच मंडळी बक्षिसे, सन्मान, पुरस्कार वगैरे मिळवून घेतात. आता याच गावात एक व्यायसायिक कंत्राटदार गावालगतच्या नदीवर पूल बांधायचे काम शासनाकडून मिळवून घेतो. पुढील वर्ष-दोन वर्षात तो पुलाचे काम पूर्ण करतो. पुलाच्या बांधकामात गावातील काही लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि बऱ्याच पिढ्यांपासून पुराचा तडाखा सोसत असलेल्या गावाला तो या जाचापासून मुक्त करतो. आता पुराचा हा प्रश्नच मुळासकट बंद होऊन जातो. त्यामुळे पुरामुळे नेहमी उभे टाकणारे प्रश्न आता येत नाही. पुराच्या वेळी वैद्यकीय आपत्ती असेल तरी दवाखान्याचा मुख्य ठिकाणी कधीही जाता येत आणि कुठलेच काम रस्त्याचा अभावी थांबत नाही.

 

पण वर्षानुवर्षे एकाच कामाचं(प्रामाणिक/अप्रामाणिक) भांडवल करून सामाजिक पुरस्कार मिळवणार्यांना नेहमीच आपण डोक्यावर घेऊन मिरवतो आणि कंत्राटदार(प्रामाणिक/अप्रामाणिक) ज्याने समस्यांचे मुळचं नष्ट केले,  त्याला मात्र नेहमी भ्रष्ट आहे, नीति आणि मूल्यांचा अभाव आहे वगैरे वगैरे बोलत असतो. काम करून सुद्धा अश्या हिणवणाऱ्या वर्गवारीला सामोरे जावे लागणे हे कुठल्या प्रगत आणि सुशिक्षित समाजाचे लक्षण आहे ? हे एक कोडंच आहे.

 

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...