Skip to main content

इवेंटीकरण

गेल्या काही वर्षापासून लोकांचा किंवा कमीत कमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणार्‍या घटनांच्या(Events) बाजूने जास्त दिसतोय, आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी प्रणाली, खाजगी कंपनी, निवडणुका, सामाजिक संस्था आणि इतरत्रही, जणूकाही समाजाला मोठमोठ्याला सतत होणार्‍या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे.

घटना(Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काही तरी अपेक्षित असतेच असे नाही. बर्‍याचदा काहीही समोर मागे नसतांनाही घटना घडवल्या जातात किंवा साजर्‍या केल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून घटना घडायच्या किंवा साजर्‍या केल्या जायच्या, त्यामुळे त्यामागे काही कारणे असायची, त्यातून काही तरी अपेक्षित असायचे. पण आता असे दिसत नाही प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्व दिले जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे होताना दिसत नाही. पण प्रक्रियेतील प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव्य रूप देण्याचा प्रयत्न मात्र सतत होत असतो. कुठलेतरी एक शाब्दिक भूषण वापरुन घटनांचा इतका गाजावजा होतोय की जणू ज्या प्रश्नासाठी किंवा समस्यासाठी हा खटाटोप सुरू आहे ते लगेच सुटलेच समजा.  

ध्वणीप्रदूषण कमी व्हावे म्हणून बर्‍याच संस्था आणि लोक “हॉर्न नको” चे माहितीफलक घेऊन चौका-चौकात दिसतात. हा सर्व प्रकार मोडतो एका विशिष्ट घटनेमध्ये (Event) ज्याचा दीर्घकालीन उपयोग होईल किंवा वाहनचालक हॉर्न वाजवणार नाही याची शक्यता खूपच कमी असते. कारण त्यामागची संपूर्ण लोकशिक्षणाची प्रक्रिया ही पुरेशी नाही. सामान्य जनतेला साधे वाहतुकीचे नियम माहिती नसतात त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणे आणि इतरांनी हॉर्न वाजविणे ही साखळी निरंतर चालूच राहील जोपर्यंत आपण मूळ प्रश्नावर काम करणार नाही. याचप्रकारे प्रक्रिया डावलून घटनांच्या मागे धावायची पद्धत आता सर्वच क्षेत्रात रूजली आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम, शिबिरे, यात्रा अश्या प्रकारच्या घटनांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन हे आता पूर्वीपेक्षा जास्त होताना दिसते, आणि विशेषकरून युवावर्गातील एका मोठ्या घटकाचा कल हा प्रक्रियेकडे नसून घटणे(Event) कडे आहे, कारण हा प्रसिद्धी मिळवायचा अगदी सोपा आणि सहज शक्य असणारा मार्ग आहे.

शहरे आणि गावे अशी वर्गवारी प्रस्थापित झाल्याने दिवसेंदिवस गावखेड्यात उपजीविकेची साधने कमी होत चालली आहे. परिणामी लोकांचे शहराकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. अश्या परिस्थितीमध्ये गावातच लोकांना रोजगार मिळेल या हेतूने बर्‍याच संस्था आणि व्यक्ति काम करत असतात आणि ती एक लांबलचक प्रक्रिया असते, अगदी एका रात्री मध्ये लोकांचा रोजगाराचा प्रश्न सुटत नसतो किंवा रोजगारासाठी लागणारे कौशल्य अवगत होण्याकरिता एक कालावधी लागतो, आणि या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्याशिवाय पुढे फार काही होऊ शकत नाही. याउलट गावातील लोकांची अवस्था बघून काही लोक त्यांना सरळ एकदा वस्तूरूपात मदत करतात, पण याप्रकारे एकदा केलेल्या मदतीच्या कार्यक्रमाने प्रश्न सुटतो काय, तर बिलकुल नाही. अशीच काही अवस्था आहे ती शेतकरी बांधवांची. शेतकरी शेतात राबून आपल्या सर्वांसाठी अन्न पिकवतो आणि त्या अन्नाच्या आधारे आपण जीवंत असतो. ही अन्न पुरवून जगाचे भरणपोषन करण्याची एक मोठी निरंतर प्रक्रिया कित्येक वर्षापासून सुरू आहे. पण एखाद्या रूग्णाला औषध देऊन जेव्हा डॉक्टर त्याला ठीक करतो किंवा त्याचे प्राण वाचवतो तेव्हा डॉक्टर ला चक्क देवासारखी वागणूक मिळत असते याउलट जो शेतकरी बांधव आपल्याला एका प्रक्रियेमार्फत जिवंत ठेवतो त्याला सन्मानजनक वागणूक कधीच मिळत नाही. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस अश्या या आपण बनविलेल्या वर्गवारीने सामाजिक आणि आर्थिक खड्ड्यात खेचल्या जातोय. एकदा प्राण वाचविणे किंवा सामुग्री पुरविणे ही एक घटना आहे आणि निरंतर रोजगार आणि अन्न पुरविणे ही एक प्रक्रिया.

याच धर्तीवर सध्याचे सरकार काम करत आहे. मोठमोठ्या घटना(Events), भरपूर जाहिरातबाजी, भपकेदार नाव यावरच जास्त भर दिल्या जातांना दिसतो आहे व घटना घडली म्हणजे काम झालेच असा लोकांना समज द्यायची किंवा आभास करून देण्याची ही उत्तम प्रणाली आहे. या सर्वांची सांगड घालून लोकांना आवश्यक असलेल्या प्रक्रियेपासून भरकवटायच आणि विविध घटनामध्ये गुंतून ठेवायच व सरकार चालवायच हीच जणू यशाची गुरुकिल्ली झाली आहे.

 

शेवटी काय तर, आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोही कडे.

Comments

Popular posts from this blog

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

"As A Country, We Need To Switch From Reactive To Proactive Ways Of Dealing With Issues Of National, Global Importance"

Last week, I spoke to a friend about the ongoing pandemic scenario and how most of our friends support people who need help. During this whole conversation, the thing which hit me the most was, she said, "Yaar, there was a lockdown and pandemic last year too, but it didn't affect me much the way this lockdown or the pandemic is affecting." This is because so many people are going through misery. So many people are dying due to lack of one or another thing. I replied immediately that "Last year, we were too involved in playing Ludo, making dalgona coffee, sharing stupid videos to realize that 30 Million people were walking towards their home without any help from the state or any institution and fellow countrymen." Many of us believe in Karma. If you do something good to someone, it will come back to you in one form or another. But, unfortunately, I think the same is happening with us. The kind ignorance we showed towards all the people walking back to their home...

वाघ एके वाघ.

बाबाराव , गेल्या ४ - ५ वर्षांपासून २मुख्य समस्यांनी ग्रासलेले आहे . पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढत त्रास आणि दुसरी म्हणजे नाईलाजाने / बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर . बाबाराव वर्धा जिल्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे . नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी - म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय . गावालगतच कुरण आणि जंगल यावर गाई - म्हशी साठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार . त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा . जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरत्या व्हायचे . तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशु होतेच , त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला . तरीपण याआधी बाबारावला   अश्या प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही . सध्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरु आहे यावर बाबाराव ला हसावे कि रडावे हेच ...