Skip to main content

हिटलर येता घरी

इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये असताना मला घरून पैशे चोरायची वाईट सवय लागली होती. पैशांच्या नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैशे ठेवल्याने दुप्पट होतात. याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो, कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन वर येतात. माझ्या चोरीच्या सवयीबद्दल जेव्हा घरी कळाले तेव्हा मला भरपूर चोप बसला आणि मला जवळपास मध्यरात्रीच्या समोरपर्यंत बाहेर ठेवण्यात आले होते. हे सर्व घडलं हिवाळ्यात व नागपूरमध्ये हिवाळ्यात बर्‍यापैकी थंडी असते. एक जमेची बाब होती ती म्हणजे मी त्या चोरलेल्या पैशांचा गैरवापर करत नव्हतो. त्यांचा वापर मी कधीच वाम मार्गी लागण्यासाठी पण केला नाही. घरच्यांनी चोप दिल्यामुळे किंवा स्वतःची चूक समजल्याने म्हणा त्यानंतर माझी चोरी करण्याची सवय मात्र तुटली. पण घरच्यांनी म्हणजेच माझ्या आई-बाबांनी प्रेमापोटी जर मला चोप दिला नसता किंवा जाब विचारला नसता आणि आपलाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित माझा चोरी करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता आणि समोर जाऊन मी एखादा मोठा चोर किंवा दरोडेखोर होऊ शकलो असतो. अर्थातच असे काही घडले नाही आणि याचे पूर्ण श्रेय जाते ते म्हणजे माझ्या आई-बाबांना. पुत्रप्रेमाला बळी न पडता त्यांनी मी केलेल्या चुकांची सावरासावर केली नाही व योग्य तो निर्णय घेतला आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. पण झालेल्या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकारण्याची आणि त्याला सुधारण्याची किती लोकं हिम्मत दाखवतात, याचे समाजातील प्रमाण पडताळून बघितले तर ते नक्कीच कमी मिळेल.

 

आपल्या अवतीभवती बरीच अशी उदाहरणे दिसतील जिथे आई-बाबांच्या प्रेमापोटी चुकलेल्या निर्णयामुळे त्यांच्या मुलांचे आयुष्य मातीत गेले. कुठलाही मोठा हुकूमशहा, गुन्हेगार, गुंड, आतंकवादी किंवा निरंकुश व्यक्तिमत्त्व असलेला/ली व्यक्ति ही जन्मजात असंवेदनशील नसते पण ती त्याप्रकारे घडत जाते आणि बर्‍याचदा ती व्यक्ति आप्तजनांनी योग्य वेळेवर जाब न विचारल्याने किंवा चुकीच्या गोष्टीला चूक म्हणून स्वीकार न केल्याने पुढे अंगवळणी पडत जाते. हुकूमशहा हा विषय निघाला की आपल्याला फक्त हिटलर आणि वर्तमान काळातील काही देशांचे राज्यकर्तेच दिसतात पण दररोजच्या जीवनातील उदाहरनांच काय ? हे सर्व हुकूमशहा अगदी लहानपनापासूनच असे नसणार, यांनी वारंवार केलेल्या चुकांना कानाडोळा झालेला असेल. आपले त्या व्यक्तीशी संबंध खराब होऊ नये किंवा प्रेमापोटी त्यांच्या पालकांनी, भावंडांनी आणि समोर जाऊन मित्रपरिवाराने कधीच त्यांना जाब विचारलेला नसेल. परिणामी, त्यांचा आत्मविश्वास वाढून ते या पातळीवर पोहचू शकले. हिटलर, ट्रंप, मोदी यांनी केलेल्या चुकांबद्दल आपण नेहमीच बोलत असतो पण हेच आपण आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत करत नाही. तेव्हा आपली नीती आणि मूल्ये ही मुद्दाम डावलली जातात.

तथाकथित सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने याप्रकरचे अनुभव अगदी जवळून बघायला मिळतात.   लोकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना जवळपास सगळेच नीती आणि मूल्यांचा डोंगर उभारतात. परंतू याच नीती-मूल्यांचा मात्र स्वतःच जीवनातील निर्णयप्रक्रियेत फार काही वाटा दिसत नाही. हिटलर सारखी पातळी गाठल्यानंतर त्याच्यावर ताशेरे ओढून फार काही उपयोग होत नाही. वेळोवेळी आपल्यासोबत किंवा आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या अन्यायाबद्दल आणि चुकांबद्दल बोलल्याने एखादा हिटलर इन मेकिंग(Hitler in making) मात्र नक्कीच दुसरी वाट घेईल.

परंतू, हे करणे आपल्याला शक्य आहे का आणि ते करण्यासाठी आपल्या पाठीत कणा उरला आहे काय  ?

आपला मित्र नेहमी मुलींना काही तरी अभद्र बोलतो पण आपण मैत्रीखातर त्याला काही म्हणत नाही. कुठलीतरी मोठी व्यक्ति काही तरी चुकीच करते तेव्हा आपण काही करत नाही कारण आपल्याला समोर जाऊन त्या व्यक्तीची गरज भासू शकते. आपले गुरु(idol/mentor) बोलतात एक आणि करतात एक पण आपण गप्प असतो कारण ते आपले गुरु असतात. आपला बॉस किंवा वरिष्ठ कुठल्यातरी विशिष्ट व्यक्तिला मजा म्हणून नेहमी त्रास देत असतो पण आपल्याला बढती हवी असते म्हणून आपण पुन्हा गप्प असतो. अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतील जेव्हा आपण आपल्या क्षुल्लक-क्षुल्लक फायद्यांसाठी सत्य आणि न्यायाची बाजू न घेता अन्यायाची बाजू घेतो आणि आपण स्वतः एका असंवेदनशील हुकूमशहाला जन्म घालतो. म्हणूनच वेळोवेळी सत्याची बाजू घेऊन उभे राहणे त्याबद्दल बोलणे हे आपल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी आवश्यक असते. संत तुकाराम म्हणूनच गेले आहेत

 

       “ राजयाचा पुत्र अपराधी देखा, परीका तो कोना दंडवेल.”

Comments

Popular posts from this blog

उद्या कि आज ?

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या जीवनावश्यक मुल्यांचा पूर्णपणे विसर पडलेल्या भविष्यातील समाजाचे, ज्याला जीवनातील प्रत्येक गोष्टी मध्ये मुल्यवृधी ची सवय झालेली आहे, अश्या या परिस्थितीत मनुष्याच्या खाजगी जीवनावरील अतिक्रमण, मोठमोठ्या कंपनीचे आक्रमक धोरणे आणि त्याचे मानवी जीवनावरील होणारे दुष्परिणाम याचे विस्तृत विवरण नंदा खरे यांनी “ उद्या” या कादंबरीत केलेलं आहे. मुल्यवृधीच्या मागे पळत असलेल्या ” उद्या “ कांदबरीतील विविध पात्रांच्या जीवनावरून त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील मुल्यावृधीचा ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं आहे. नातीगोती खूप क्वचित झालेली आहे. लोकांच्या जीवनातील प्रेम,करुना या भावनेचे स्थान आता मुल्यवृधीने घेतलेले आहे. परिणामी समाजात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे. निसर्गत कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्री वर याचा खूप वाईट परिणाम झालेला आहे. स्त्रियांचे बाहेर एकटे पडणे अशक्य झालेलं आहे. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नं...

TISSision for Equality

Since 21st February students from 4 campuses of TISS(Mumbai, Tuljapur, Hyderabad, Guwahati) have boycotted the classes and all academic work. TISS is India's oldest institute of Social sciences studies. It has produced many personalities who have shaped society in a posting manner. TISS has also helped Indian Government in the planning of many so many public policies for the betterment of society through rigorous research and for same it has garnered much appreciation from everyone. Notably TISS always have representation from every caste, class and strata of the society. It has helped many students to climb the social ladder by ensuring education to every eligible person irrespective of caste, religion and economic class. In the history of more than 80 years of this diverse, free and liberal institution, this is the first time when students took such stand against the administration. TISS administration have asked students from SC, ST and OBC category to deposit the full cours...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...