Skip to main content

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे. गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो(शहर किंवा गाव), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा, आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की.

एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा एखाद्या व्यक्तीने जीवनात किती यश संपादन केले याचा विचार होत असतांना त्याला अवगत असलेले कौशल्य, ज्ञान आणि मिळवलेले गुण याचाच नेहमी विचार केला जातो. तो व्यक्ति राहतो कुठे, किती पैसे कमावतो, कुणासोबत उठतो-बसतो यावरून त्याचे समाजातील स्थान आणि तो व्यक्ति किती यशस्वी आहे हे मोजले जाते. पण त्या व्यक्तीने हे सर्व कौशल्य आणि यश कुठल्या परिस्थितीत मिळवलेले आहे याबद्दल कधीच बोललं जात नाही आणि त्याचा विचार पण केला जात नाही. सर्वांना कधीच एकसारख्याच परिस्थितीला सामोरे जावं लागत नाही. दररोज वर्तमानपत्र वाचणार्‍याला साहजिकच जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा बर्‍यापैकी अंदाज असतो व त्याचे सामान्य ज्ञान पण बरे असते. वर्तमानपत्र ही शहरात राहणार्‍या लोकांसाठी ही एक गरज आहे. पण हेच वर्तमानपत्र गावातील किंवा दुर्गम भागातील व्यक्तीसाठी एक चैनीची वस्तु असते, व ती सर्वसामान्य लोकांच्या घरी दिसून येत नाही. साहजिकच आहे की बहुतांश लोकसंख्या वर्तमानपत्रापासून वंचित राहते व सोबत येणार्‍या ज्ञानापासून पण. एका साध्या वर्तमानपत्राचा इतका मोठा परिणाम होत असेल तर इतर महत्त्वाच्या बाबींनी किती मोठा फरक पडत असेल याचा अंदाज बांधणे हे अशक्यच. कारण कुणासाठी कुठली बाब महत्त्वाचची असेल हे आपण कधीच ठरवू शकत नाही. ३-४ पिढ्यांपासून शिक्षणाची परंपरा असलेल्या घरातील लोकांना साहजिकच शिक्षण क्षेत्राची माहिती ही कितीतरी पटीने जास्त असते. त्या घरातील लोकांची तुलना आपण जेमतेम या पिढीपासून सुरू झालेल्या घरातील लोकांशी करूच शकत नाही. हेच साहित्य, क्रीडा, कला, संशोधन, मनोरंजन इत्यादि साठी लागू होतं. तुम्हाला साहित्याबद्दल माहिती नाही, खेळाबद्दल माहिती नाही यासाठी कमी लेखलं जातं. ज्यांना वर्तमानपत्र वाचने हे भाग्याचे काम वाटते त्यांना असल्या मोजपट्टीत बसवणे हा आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांचा मोठा मूर्खपणा आहे. चारचाकी नसलेल्या व्यक्तिला चारचाकी चालवता येत नाही यासाठी हिणवणे यात काय शूरपणा ? सर्व बाजू जमेच्या असतील तर काम करणे किंवा यश संपादन करणे हे नेहमीच सोपं जातं. त्यामुळे कुठल्या परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे याला जास्त महत्त्व असले पाहिजे. 

गेल्या काही वर्षात “सेव मेरीट, सेव नेशन” या चळवळीला बराच वेग येतांना दिसतोय. म्हणजेच काय तर गुणवत्ता असलेल्या लोकांना वाचवा म्हणजे देश वाचेल. याचा अर्थ असा की जे आधीच हुशार आणि गुणवत्त आहे त्यांना त्यांची गुणवत्ता वाढवायला आणखी प्रयत्न करा व त्यांना अतिरिक्त अधिकार द्या. भारत देश हा आधीच विविध प्रकारच्या वर्गवारीने ग्रासलेला आहे त्यात आणखी एका वर्गवारीची भर घालणे कितपत बरोबर हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. समजा आपण हे केले सुद्धा तर काय नेमके काय होईल ? आधीच विविध स्वरुपात असेलेल्या होणार्‍या फायद्यांमद्धे आणखी काही फायदे फक्त काही निवडक लोकांसाठी जोडले जातील व वंचित असलेले हे अनंत काळासाठी वंचितच राहतील. यामुळे समाजात आधीच मोठी असलेली आर्थिक विषमतेची आणि सामाजिक विषमतेची दरी आणखी मोठी होत जाणार, जी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बाधा ठरेल. 


https://www.esakal.com/authors/aakaash-nvghre

 

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...