Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

न दिसणारे नेपोटीज्म

काही महिन्यांपूर्वी एका भारतीय अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी आणि त्यामागे कोण किंवा काय असेल हे अद्याप एक गुढचं आहे. पण त्यानंतर ज्याप्रकारे समाजातील सर्वच भागांतून हिंदी चित्रपट सृष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने हिणवले गेले , ते अगदी लाजिरवाणे होते. प्रत्येक दोन-तीन दिवसात एक नवीन कारण घेऊन हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य केल्या जात होते. त्यातले एक बरेच गाजलेले कारण म्हणजे “नेपोटीज्म( Nepotism)” . समाजातील बहुतेक लोकांना “नेपोटीज्म” चा अर्थ सुद्धा माहिती नाही तरी या शब्दाचा कित्येक दिवस रवंथ केल्या गेला. गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून राजकरणात पण याच विषयाचा बोलबाला आहे . या धर्तीवर एका पूर्वनियोजित कामाप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य करण्यात आले. “ नेपोटीज्म” म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तिला एखाद्या कामाकरिता दिले गेलेले प्राधान्य. अश्या वेळेस त्या व्यक्तीची पात्रता , क्षमता आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते. पर्यायी दूसरी व्यक्ति त्या विशिष्ट व्यक्तिपेक्षा उत्तम किंवा योग्य असून सुद्धा त्याचा विचार केला जात नाही. वेगळ्या श...

स्वार्थापोटी

गेल्या 1 महिन्यापासून संपूर्ण भारतात इंडियन प्रिमियर लीग चा धुमाकूळ दिसतोय. यूरोपियन फुटबॉल च्या धर्तीवर भारतात सुद्धा शहरानुसार व्यावसायिक तत्वावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. विविध शहरानुसार संघ व खेडाळू वाटले गेले. हा पूर्ण प्रकार अगदी व्यावसायिक तत्वावर सुरू असतो. यात देशाचा अभिमान किंवा शहराचा अभिमान वगैरे काहीच नसते. केवळ मनोरंजन हा हेतु लक्षात घेऊन या   लीग चे आयोजन केले जाते. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात एक सामना झाला व कोलकाता संघाने चेन्नई संघावर मात केली. चेन्नई संघाचा कर्णधार आहे महेंद्रसिंह धोनी व त्याला ५ वर्षाची छोटी मुलगी आहे. हा पराभव काही लोकांनी इतका मनावर लावून घेतला की चक्क धोनीच्या मुलीला सार्वजनिकरित्या नको त्या धमक्या देण्यात आल्या. कामगिरीसाठी संघाची किंवा संघातील खेडाळूंची टीका करणे हे साहजिकच आहे. पण एका व्यावसायिक संघाच्या पराभवाबाबत इतके वाईट वाटणे आणि त्यामुळे खेडाळूंच्या घरच्यांना धमकी देणे हा सर्वच प्रकार आज आपण कुठल्या प्रकारच्या समाजात राहतो याची जाणीव करून देते. गेल्या काही वर्षापासून नको त्या खालच्या पातळीवर जाऊ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

कार्य-करता

गेल्या ८-९ वर्षात समाजातील कळत नकळत होणार्‍या विविध प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढा देणार्‍या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्‍या भरपूर व्यक्तींसोबत आणि सामाजिक संस्थांसोबत अगदी जवळचा संबंध आला. यातील काही व्यक्तींची किंवा संस्थांची पद्धती ही संघर्षाची तर काहींची नवनिर्माणाची. पण जवळपास प्रत्येक व्यक्तीचं आणि संस्थेचं काम हे उल्लेखनीय आणि तितकेच समाजाच्या हिताचे आहे. याप्रकारचे काम करणार्‍या व्यक्तीला समाजात “कार्यकर्ता” किवा “सामाजिक कार्यकर्ता” म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील काही लोकं स्वतंत्र्य म्हणजेच कुठल्याच संस्थेमार्फत किंवा संस्थेच्या नावाखाली काम न करण्याला पसंती देतात. तर काही लोकांना संस्थेसोबत काम करणे पटते. स्वतंत्र व्यक्तीगत काम करण्याचे तसेच संस्थेमार्फत काम करण्याचे साहजिकच काही फायदे तसेच काही तोटेसुद्धा असतात. स्वतंत्र काम करत असतांना तुमचे काम जर प्रस्थापितांच्या हितसंबंधांना उघड करत असतील किंवा प्रस्थापितांद्वारे होणार्‍या अन्यायाला उघड करत असतील तर तुमचे दैनंदिन जगणे हे अवघड होऊ शकते. दिवसेंदिवस ज्याप्रकारचे असहिष्णु वातावरण भारतात वाढताना दि...

सत्यगाथा

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका भारतीय कलाकाराचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळलेले नाही. तेव्हापासून संपूर्ण भारताला किंवा भारतातील माध्यमांना फक्त आणि फक्त त्या घटनेचे वेध लागलेले दिसत आहेत. त्या घटनेनंतर कोरोंना ,  पुरस्थिती , बेरोजगारी , डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी बरीच संकटे सतत भारताला प्रश्न विचारात आहे. इतके असूनही अपवाद एक दोन माध्यमे सोडली तर कुणीच या खर्‍या प्रश्नांबद्दल बोलत नाही आहे. हा जोमात सुरू असलेला खेळ सर्वांनाच माहिती आहे , तरी मी हे लिहिण्याचा खटाटोप का करतोय हे बघूया. महात्मा गांधीजींचे तीन माकड हे भारतात बरेच प्रसिद्ध आहे. या तीन माकडांपैकी एकाने त्याचे डोळे झाकलेले आहे , दुसर्‍याने कान झाकलेले आहे तर तिसर्‍याने तोंड झाकलेले आहे. या तीन माकडांच्या तत्वज्ञानाचे मूळ जपान या देशातील आहे. साधारण १७ व्या शतकापासून या तत्वज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय. हे उदाहरण “वाईट बघू नका , वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका” अशी शिकवण देते. शांतता आणि सहनशीलतेच्या प्रचारात या तत्वज्ञानाचा महात...

रंग माझा राखाडी

रंगांच्या संचामधे काळ्या आणि पांढर्‍या रंगांना कमालीचे महत्त्व असते. दोन्ही रंग हे स्वतः मधे परिपूर्ण असून त्यांचे एक वेगळे भावनिक आणि लाक्षणिक अस्तित्व आहे. या दोन्ही रंगांचा स्वभाव मात्र एकमेकांच्या अगदी उलट. पांढरा रंग हा शांतता , शुद्धता , सुरक्षितता , प्रकाश , सज्जनता अश्या विविध बाबींचा प्रतीक आहे. तर दुसरीकडे काळा रंग हा गूढ , रहस्य , संताप , कुरापत , अधिकार , भय , शक्ती असल्या विविध बाबींचा प्रतीक मानला जातो. या दोन्ही रंगातील आणि त्यांचा गुणधर्मातील तफावत ही अगदी उघड , स्पष्ट आणि प्रकर्षाने जाणवणारी आहे. त्यामुळे या दोन्ही रंगांच्या बाबतीत संभ्रमात पडणे हे अतिशय कठीण. काळ्या आणि पांढर्‍या रंगां मध्ये असंख्य अश्या विविध राखाडी छटा येतात. या छटांमध्ये काळ्या आणि पांढर्‍या दोन्ही रंगांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. एखाद्या छटेमध्ये पांढरा रंग वरचढ असतो तर दुसर्‍या छटेमध्ये काळा रंग हा वरचढ असतो. याच धर्तीवर मानवी स्वभाव आणि समाज पण विविध छटांनी रंगलेला असतो. कुठलीच व्यक्ति आणि त्या व्यक्तीचा स्वभाव हा एकाच बाबीने परिपूर्ण असेल असे होत नाही. स्वभावातील आणि आय...

ठपकेबाजी

गेल्या ७ महिन्यात वेगवेगळ्या सदरामध्ये आपण समाजात असलेल्या विविध प्रकारच्या वर्गवारीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रमाण , गुणधर्म , समाजावर होणारे परिणाम या बाबींचा पण विचार करण्यात आला. याप्रकारच्या वर्गवार्‍या भूतकाळात पण होत्या आणि त्या भविष्यकाळात पण राहणारच. त्यांना ओळखणे , त्याबद्दल विचार करणे आणि चर्चा घडवून आणण्याचे धाडस आपण अंगीकृत करणे ही काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्या सतत प्रयत्नांनी आपण त्यांची तीव्रता आणि त्यांच्या होणार्‍या परिणामांवर मात्र थोडं का होईना आळा घालू शकतो. आता चालू असलेल्या दशकामध्ये भारत देशाने आणि भारतातील जनतेने अनेक प्रकारचे चढ-उतार       (बहुतेक टोकाचे) बघितलेले आहे. यात सामाजिक , आर्थिक , धार्मिक , वैयक्तिक , शैक्षणिक , सांप्रदायिक ,   इतर जटिल व न दिसणार्‍या बाबींचा पण समावेश आहे. मागील काही वर्षापासून एक वर्गवारी (तशी जुनीच) नव्याने वर डोक काढत आहे. ती वर्गवारी म्हणजे , समाजातील लोकांना आपल्या पूर्वग्रहीत विचारांमुळे सोयीस्कर अशे ठपके लावणे व या ठपक्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी ...

“शिक्षणवारी”

मी मुख्य नागपुर शहरापासून दहाएक किलोमीटर दूर राहतो आणि हे अंतर तसं बघितलं तर फार नाही आहे. अगदी माझ्या बालपणापासून दळणवळणाची साधने पण मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आधी एसटीचा लाल डब्बा , नंतर स्टार बस व सोबतीला आटोरिक्षा यांची बरीच रेलचेल सुरुवातीपासूनच असायची. अंतराबद्दल बोलायच झालं तर नागपूरमधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय माझ्या घरापासून अगदी ८०० मीटर अंतरावर आहे , वैद्यकीय महाविद्यालय ५ किंलोमीटर अंतरावर आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालय हे ८ किलोमीटर अंतरावर आहे. ही सगळी अंतरे सांगण्यामागचे कारण असे  की ही वेगवेगळी अंतरे आपल्याला फार वाटत नाही आणि इतक्या कमी अंतरामुळे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये खूप काही फरक पडणार नाही असा बहुतेकदा आपला समज असतो. दहावीचा निकाल हातात येईपर्यंत डॉक्टर व्हायच असेल तर अकरावी ला प्रवेश घ्यायचा आणि अभियांत्रिकीकडे जायच असेल तर तंत्रविद्यानिकेतन( Polytechnic) ला प्रवेश घ्यायचा यापलीकडे काहीच माहित नव्हतं. अभियांत्रिकी ला राज्यस्तरीय महाविद्यालये वेगळे , राष्ट्रस्तरीय वेगळे आणि नंतर आई.आई.टी( IIT) वेगळे आणि...

हिरोपंती

दिवसेंदिवस माणसाचे जीवन खूप सोयिस्कर होत चालले आहे. जवळपास सर्वच गोष्टी अगदी सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने पूर्वी विविध प्रकारच्या कामातील रोमांच आता अनुभवता येत नाही. त्यामुळे तो रोमांच आपण चित्रपट किंवा संगणकीय खेळांमध्ये शोधत असतो. संगणकीय खेळांचा प्रसार हा विशिष्ट वयोगटांत मर्यादित असतो . पण चित्रपटाचे तसं नाही , अगदी लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच लोकं चित्रपट बघत असतात. म्हणूनच चित्रपट आणि चित्रपटसृष्टी हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीतरी आपण एखादा तरी चित्रपट बघतोच. आजकाल भारतीय चित्रपट किवा इतर चित्रपट सुद्धा बर्‍यापैकी व्यावसायिक झालेले आहे. त्यामुळे त्यात सत्याचा असत्यावर विजय , न्यायाचा अन्यायावर विजय , प्रचंड मारामारी वगैरे याप्रकारचे चित्रपट भरपूर बनवले जातात. याप्रकारचे चित्रपट बघतांना बहुधा आपण सर्वच श्रोते सत्याची किंवा न्यायाची बाजू घेतो आणि नायक कश्याप्रकारे खलनायकावर मात करू शकतो याबद्दल सारखा विचार करत असतो. बहुधा नायकाची किंवा सत्याची बाजू घेण्याचा कुठलाच संबंध हा श्रोत्यांच्या व्यक्तिमत्वाशी दिसून येत...

सकाराम-नकाराम

आपण सतत-सतत गोड पदार्थ खात असलो की लवकरच आपल्याला गोड पदार्थांचा वीट येतो आणि ते येणं अगदी साहजिक आहे. मग यावर उपाय काय तर आपण झणझणीत तिखट खातो आणि चव बदलण्याचा प्रयत्न करतो. हिच परिस्थिती सध्या आपल्या समाजाची होऊन बसली आहे , अक्षरषा समाजातील बहुसंख्य लोकांना गोड-गोड बोलण्याचा पुळका आलेला आहे. म्हणजे काय तर समाजातील आणि अवतीभवती होणार्‍या फक्त “सकारात्मक” गोष्टींकडेच लक्षं द्यायचं किंवा दखल घ्यायची आणि बाकी गोष्टी जणू अस्तित्वातच नाही आहे हे धरून चालायच. या लेखमालेच्या सुरूवातीच्या “समाजातील वर्गवारीवर प्रकाशझोत टाकण्याची गरज” या लेखात नमूद केल्याप्रमाणे असं हे सकारात्मक-सकारात्मक किती दिवस चालेल आणि अश्या या प्रवृत्तीमुळे समाजाचे किंवा आपले वैयक्तिक किती भले होईल ? किंवा फक्त सकारात्मक बाबींकडेच लक्ष दिल्या गेलं तर नकारात्मक बाबींमध्ये अडकलेले लोकं आणि त्यांच्या प्रश्नांच काय होईल ? उदाहरणार्थ मला अभ्यासक्रमात भूगोल , गणित , विज्ञान आणि इतिहास हे चार विषय आहेत. या चार दिलेल्या विषयापैकी भूगोल , इतिहास आणि विज्ञान या तीन विषयात मला नेहमी छान गुण पडतात म्हणजेच ही झाली...

हिटलर येता घरी

इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये असताना मला घरून पैशे चोरायची वाईट सवय लागली होती. पैशांच्या नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैशे ठेवल्याने दुप्पट होतात. याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो , कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन वर येतात. माझ्या चोरीच्या सवयीबद्दल जेव्हा घरी कळाले तेव्हा मला भरपूर चोप बसला आणि मला जवळपास मध्यरात्रीच्या समोरपर्यंत बाहेर ठेवण्यात आले होते. हे सर्व घडलं हिवाळ्यात व नागपूरमध्ये हिवाळ्यात बर्‍यापैकी थंडी असते. एक जमेची बाब होती ती म्हणजे मी त्या चोरलेल्या पैशांचा गैरवापर करत नव्हतो. त्यांचा वापर मी कधीच वाम मार्गी लागण्यासाठी पण केला नाही. घरच्यांनी चोप दिल्यामुळे किंवा स्वतःची चूक समजल्याने म्हणा त्यानंतर माझी चोरी करण्याची सवय मात्र तुटली. पण घरच्यांनी म्हणजेच माझ्या आई-बाबांनी प्रेमापोटी जर मला चोप दिला नसता किंवा जाब विचारला नसता आणि आपलाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित माझा चोरी करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता आणि समोर जाऊन मी एखादा मोठा चोर किंवा दरोडेखो...

इवेंटीकरण

गेल्या काही वर्षापासून लोकांचा किंवा कमीत कमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणार्‍या घटनांच्या( Events ) बाजूने जास्त दिसतोय , आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी प्रणाली , खाजगी कंपनी , निवडणुका , सामाजिक संस्था आणि इतरत्रही , जणूकाही समाजाला मोठमोठ्याला सतत होणार्‍या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे. घटना (Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काही तरी अपेक्षित असतेच असे नाही. बर्‍याचदा काहीही समोर मागे नसतांनाही घटना घडवल्या जातात किंवा साजर्‍या केल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून घटना घडायच्या किंवा साजर्‍या केल्या जायच्या , त्यामुळे त्यामागे काही कारणे असायची , त्यातून काही तरी अपेक्षित असायचे. पण आता असे दिसत नाही प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्व दिले जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे होताना दिसत नाही. पण प्रक्रियेतील प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव...

तंत्र-न-ज्ञान

गेल्या अनेक वर्षापासून मानवप्रजाती मंगळावार घर वसवण्याची गोड स्वप्न बघत आहे. काळ इतक्या वेगाने बदलतो आहे की तंत्रज्ञानाच्या जोरावर काहीही करू शकण्याची धम्मक आता मानवप्रजाती बाळगत आहे. पण हा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता , इथपर्यन्त पोहोचायला सुद्धा माणसाला बरीच वर्षे लागली. अश्मयुग , धातुयुग , यंत्रयुग , अश्या विविध टप्प्यातून आजचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. सध्या आपण माहिती तंत्रज्ञान आणि बिग डाटा या युगात जगतो आहे हे म्हणायला हरकत नाही. यंत्रयुगात ४ औद्योगिक क्रांत्या घडून आल्या. पाणी आणि वाफेचा शक्तीचा उपयोग करून यंत्र चालवून उत्पादन करणे हे पहिल्या औद्योगिक क्रांति मध्ये शक्य झाले. दुसर्‍या मध्ये विजेचा वापर करून आणि तिसर्‍या मध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे औद्योगिक क्रांति घडून आली. आता आपण बघत असलेली ही चौथी औद्योगिक क्रांति आहे ज्यात तिसर्‍या औद्योगिक क्रांतीतील काही घटक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), इंटरनेट ऑफ थिंग्ज , जनुकीय तंत्रज्ञान( Genetic Engineering ) , यंत्रमानव आणि रोबोटिक्स अश्या विविध वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून अश...

प्रगतीच्या वाटा.

साल २०१३ पासून विकास या शब्दाचा उपयोग आपल्या देशात बराच होताना दिसतोय. २०१४ ची पूर्ण लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा या दोन्ही निवडणूका एका मोठ्या पक्षाकडून विकास हा मुद्दा घेऊनच लढल्या गेल्या. "सबका साथ , सबका विकास" हा नारा देऊन भारतीय जनता पक्षाने दोन्ही कडे मोठा विजय संपादित केला. अर्थातच विकास किंवा प्रगति या मुद्द्यावर निवडणूक लढणे ही लोकशाही साठी जमेची बाब आहे. सगळ्यांचा विकास होईल हे नक्कीच छान आहे , आणि त्याची गरज सुद्धा आहे. पण भारतासारख्या   वैविध्यपूर्ण देशात सर्व लोकांचा विकास हा सारखाच असणे अपेक्षित नाही अथवा प्रदेशानुसार आणि लोकांनुसार विकासाचे स्वरूप हे नक्कीच वेगळे असणार. त्यामुळे लोकांची गरज काय आहे याचा विचार न करता आपल्या प्रस्थापित विकासाच्या परिभाषा आणि विकास त्यांचावर लादणे हा एक प्रकारचा अन्यायच असेल. माणसाचा विकास म्हणजे नेमके काय ? संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाच्या(युनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्राम) मानवी विकासाच्या परिभाषेत अर्थव्यवस्थेच्या एकंदर वाढीला प्राध्यान न देता मानवी जीवन कितपत समृद्ध आहे याला महत्त्व दिले आह...

शेती विना माती.

गेल्या एक महिन्यापासुन इतर देशाप्रमाणे आपल्या देशात सुद्धा कोरोना नामक रोगाने थैमान घातला आहे. रोगाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात २४ मार्च पासून संचारबंदी(लॉकडाऊन) लागू करण्यात आली. एकूणच संचारबंदी हि समाजातील सर्व घटकांचा विचार न करता केल्यामुळे बऱ्याच लोकांची वाताहत होताना आपण गेल्या १ महिन्यापासून बघतोय. देशभरात मजूर लोकांची दयनीय अवस्था झालेली आहे. स्थलांतरित कामाच्या ठिकाणी काम आणि परिणामी जगण्याकरिता लागणारा पैसा उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडे मूळ गावी जाणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. पण दळणवळणाची कुठलीच साधने उपलब्ध नसल्याने मोठा मजूर वर्ग हा चालत चालत समोर निघून गेला. साधने आणि दुकानाच्या अनुपस्थितीमुळे या लोकांना खायला काही मिळत नव्हते आणि इतक्या मोठ्या संख्येत असलेल्या लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी सोय करणे हे सुरुवातील सरकारी यंत्रणेला झेपण्यासारखे पण नव्हते. अश्या या अवस्थेमध्ये समाजातील बऱ्याच लोकांनी आणि विविध संस्थांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त लोकांना   पुरेपूर अन्न पुरवण्याचा प्रयत्न केला गेला , आणि हे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे.   ...